अजित पवार यांची सरकारवर सडकून टीका

अजित पवार यांची सरकारवर सडकून टीका

औरंगाबाद : राज्य सरकारने आज 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेतलंय. पण सरकारच्या या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. निलंबन करताना 19 आमदारांचे एकसोबत निलंबन केले आणि आता निलंबन टप्प्या टप्प्याने का मागे घेताय. जोपर्यन्त चांदा ते बांदा संघर्ष यात्रा होणार नाही तोपर्यन्त सभागृहात परत जाणार नाही. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षांनी आयोजित केलेली संघर्षयात्रा आज औरंगाबादमध्ये पोहोचली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने नऊ आमदारांचं निलंबन मागे घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय. निलंबन करताना 19 आमदारांचं केलं आणि ते मागे घेताना 9 आमदारांचंच कशाला? असा सवालही अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे. विशेष म्हणजे, सर्व 19 आमदारांचं निलंबन मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

COMMENTS