आजपासून तीन दिवस बॅंका बंद

आजपासून तीन दिवस बॅंका बंद

मुंबई – देशातल्या सर्व बॅंका आजपासून सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे रोखीचे व्यवहार करणाऱ्यांना पैशांची अडचण निर्माण होवू शकते. आज, चौथा शनिवार असल्यामुळे बॅंकांना सुट्टी असते. तर उद्या रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बॅंकांना सुट्टी राहणार आहे.
इतक्‍या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. एटीएम कोरडी पडू नयेत यासाठी पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात एटीएममधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली जाते. हा विचार करूनच एटीएममध्ये पुरेशी रक्कम भरण्यात येणार आहे. रोख रकमेद्वारे व्यवहार केल्याने एटीएमवर भार पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातील बहुसंख्य व्यवहार ऑनलाइन अथवा डिजिटल माध्यमातून करण्याचे आवाहन बँकांतर्फे करण्यात आले आहे.

 

COMMENTS