आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत उद्या निर्णय

आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत उद्या निर्णय

शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधानसभेत गोंधळ घालणाऱया 19 आमदारांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. या निलंबनावर मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. 

अर्थसंकल्प मांडला जात असताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाचे अवमान केल्याने यातील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नारायण राणे आणि जयंत पाटील यांनी केली होती.

COMMENTS