कर्जमाफीचे निकष बदलायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

कर्जमाफीचे निकष बदलायला सरकारला भाग पाडू – अजित पवार

बारामती – सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची फसवणूक केल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. धनदांडग्यांना कर्जमाफी नको, मात्र सर्व गरजूंना कर्जमाफी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. सरकारने शेतक-यांची केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही, त्यांना कर्जमाफीचे निकष बदलायला भाग पाडू असा इशारा अजित पवार यांनी दिला. सरकारने शेतक-यांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे, त्यावर विचारले असता अजित पवार बोलत होते. घोषणा करायच्या, त्यात अटी लादायच्या आणि त्याचा कोणालाही फायदा होणार नाही याची दक्षता घ्यायची अशीच सरकारची कूटनिती असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

COMMENTS