कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

बीड – कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील पांढऱ्याचीवाडी गावातील दीपक एकनाथ शेळके (वय 21) या तरूणाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

वडीलांचा कर्जबाजरीपणा, सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने जीवन संपवले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.  हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.  दिपकच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

COMMENTS