किती शेतकऱ्यांचा सातबार कोरा झाला, हे पारदर्शक कळाले पाहिजे – उद्धव ठाकरे

किती शेतकऱ्यांचा सातबार कोरा झाला, हे पारदर्शक कळाले पाहिजे – उद्धव ठाकरे

औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथीलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. औरंगाबादेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्यातला शेतकरी खरेच कर्जमुक्त होतोय का हे पाहण्यासाठी मी दौरा करतोय, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मध्यावधीच्या निवडणुकीचा जितका खर्च होणार आहे, तितके पैसे शेतकऱ्यांना द्या. चाळीस लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी मला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

गॅस सबसिडी नाकारणारे दोन कोटी कुठे आहेत? तसेच शेतकऱ्यांचे होईल. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावा. जे कर्जवसुलीसाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या समोर ढोल लावत होते, त्यांना आता सांगा. सगळं पारदर्शक मला कळले पाहिजे, हे जर होत नसेल तर हा भंपकपणा आहे. असं  उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहे.

 

 

COMMENTS