केंद्रात मंत्री होण्यासाठीच राजू शेट्टींचा आटापिटा, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

केंद्रात मंत्री होण्यासाठीच राजू शेट्टींचा आटापिटा, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

सातारा – केंद्रीय मंत्रीमंडळाचा आगामी विस्तार डोळ्यासमोर ठेऊनच राजू शेट्टी शेतकरी कर्जमाफीवर आक्रमक झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तेत सहभागी आहेत. सत्ता आल्यापासून ते शेतक-यांच्या प्रश्नाविषयी गप्प होते. आता मात्र शेतकरी आंदोलनात उतरल्यानंतर त्यांना जाग आली आहे. तसंच आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी शेतकरी आंदोलनात आक्रमक झाल्याची टीकाही चव्हाण यांनी केलीय.

COMMENTS