“चीन भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत”

“चीन भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत”

दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून भारताचे चीनसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे चीन भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा माजी संरक्षणमंत्री आणि समाजवादी पार्टीचे खासदार मुलायमसिंग यांनी केला आहे. लोकसभेमध्ये आज भारत चीन यांच्या सध्याच्या ताणलेल्या संबंधावर चर्चा झाली त्यावेळी त्यांनी हा दावा केला. त्यामुळे भारताने चीनपासून सावध रहावे असा सल्लाही त्यांनी दिलाय. भूतान आणि सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले. पाकिस्तानपेक्षा भारताला चीनपासून अधिक धोका असल्याचंही मुलायमसिंह म्हणाले. चीनने पाकिस्तानाला क्षेपणास्त्र दिली आहेत असाही दावा त्यांनी केला. तसंच सरकारचं चीनविषयीचं धोरण काय हे सरकार का जाहीर करत नाही. असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

COMMENTS