…तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू, बच्चू कडू यांचे खळबळजनक वक्तव्य !

…तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू, बच्चू कडू यांचे खळबळजनक वक्तव्य !

शेतक-यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या नाहीत तर शहीद भगतसिंग यांनी ज्याप्रमाणे बॉम्ब टाकला होता, तसाच बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्याच्या घरावर टाकू असं वक्तव्य करुन आमदार बच्चू कडू यांनी एकच खळबळ माजवली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक प्रक्षोभक विधाने केली. सरकार आमच्यावर दरोडा टाकंतय आणि आमच्याच लोकांवर दरोड्याचे गुन्हे दाखलं करतंय. सरकारची शेतक-यांविरोधात दंगल सुरू आहे. सरकारने शेतक-यांच्या विरोधात तलवार काढली आहे त्यामुळे त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल अंसही आमदार कडू म्हणाले. नाशिकमध्ये शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत बोलतांना त्यांनी हे भाषण केले. सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपू पाहात आहे. शेतकऱ्यांवर सरकार गोळ्या चालवायला लागले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोठे प्रयत्न केले. ‘आसूड’ यात्रासारखी आंदोलन केली. ती भाषा या सरकारला समजत नाही. त्यामुळे त्यांच्याच भाषेत यापुढे सरकारला सांगितलं जाईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

COMMENTS