“….तर येत्या 15 दिवसात भारत चीन युद्ध” !

“….तर येत्या 15 दिवसात भारत चीन युद्ध” !

डोकलामधील सैन्यावरुन गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. डोकलामधून भारताने विनाअट सैन्य मागे घ्यावे अशी चीनची मागणी आहे. मात्र भारत चीनच्या मागणीला भीक घालत नाही.  त्यामुळ चीनकडून विविध मार्गांनी भारताला धमक्या देणं सुरू आहे.

भारतानं डोकलामधून सैन्य मागे घेतलं नाही तर येत्या 15 दिवसात चीन भारतावर हल्ला करु शकतो असं चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्रानं चीनमधील संरक्षण तज्ञ्जन्यांच्या हवाल्यानं दिलं आहे. हल्ला करण्याच्या आधी भारताला अवगत केलं जाईल असंही त्या बातमीत म्हटलं आहे.

विविधी मार्गांनी चीन भारतावर सैन्य मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिबेटमध्ये चीन सैन्याचा युद्ध सराव सुरू असल्याच्या बातम्या चीनच्या सरकारी वाहिनीवर सातत्यानं येत आहेत. त्याचे फोटोही त्यासोबत दाखवले जात आहेत. भारतावर दबाव आणण्याचा तो प्रकार असल्याचं बोलंलं जातंय. आता युद्धाची भाषाही त्याचाच भाग असल्याचं बोललं जातंय.

COMMENTS