….. तर शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असता – धनंजय मुंडे

….. तर शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असता – धनंजय मुंडे

सोलापूर, (बार्शी) – राज्य सरकारने संकुचित मनाने कर्जमाफी केली आहे. थोडं मोठं मन दाखवलं असतं तर शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा झाला असता असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी लगावला आहे. बार्शीमधील वंजारी समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य  केलं. तसंच गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेली आंदोलने,  विधिमंडळातील मागणी आणि शेवटच्या टप्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन उचलून धरल्याने राज्य सरकारला विरोधी पक्षांसमोर झुकावं लागल्याचं सांगून कर्जमाफीच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS