तीव्र उन्हामुळे मतदानाची वेळ वाढवली !

तीव्र उन्हामुळे मतदानाची वेळ वाढवली !

राज्यात चंद्रपूर, परभणी आणि लातूर महापालिकेची निवडणूक येत्या 19 एप्रिलला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या तीनही ठिकाणच्या मतदानाची वेळ वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. या तीनही ठिकाणी आता सकाळी 7.30 ते संध्याकाळी 6.30 असं तब्बल 11 तास मतदान करता येणार आहे. या तीनही शहरात प्रचार संपण्याच्या दिवशी 17 एप्रिल रोजीचा प्रचार वेळ देखील वाढवण्यात आला आहे. आता 17 तारखेला संध्याकाळी 6.30 पर्य़ंत प्रचार करता येणार आहे.

COMMENTS