‘शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावा’, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावा’, सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम  यांच्यासह शिवसेनेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी आज (मंगळवारी)  ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.  मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवस विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केलीय.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतक-यांची कर्जमुक्ती, सर्व शेतकऱ्यांची तूर विकत घेणं. आणि झालेल्या गारपीट बाबत ताबडतोब शेतकर्यांना मदत करणं या बाबत दोन दिवस अधिवेशन आणखी घ्यावं अशी मागणी शिवसेनेनं आज मुख्यमंत्र्यांकडे केली. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठीच आपण इथे बसलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांनी भाजप गट नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असं आश्वासन दिलं आहे.’ असं पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले.

दरम्यान, तूर प्रश्नावरही रामदास कदम यांनी उत्तर दिलं. ‘शिवसनेचं शिष्टमंडळ उद्धवजींच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांना भेटलं. या भेटीनंतर त्यांना जी तूर खरेदी बंद होती ती तात्काळ सुरु करण्यात आली. जितके शेतकरी खरेदी केंद्रावर उभे होते त्या सर्वांची तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेनं काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही.’ असंही रामदास कदम म्हणाले.

कर्जमाफी करणं हा सर्वात पहिला विषय आहे. अवकाळी पाऊस आमि गारपीट यांना शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे या सगळ्याच विषयांवर विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलवावं अशी आम्ही मागणी केली आहे.’  अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

COMMENTS