दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याच्या निषेर्धात राज्यभर आंदोलन करणार – अशोक चव्हाण

दानवेंनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याच्या निषेर्धात राज्यभर आंदोलन करणार – अशोक चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासरखं आहे. त्यांच्या वक्तव्याची आम्ही निंदा करतो.  भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्यांची माफ़ी मागवी. साला ही पदवी शेतकऱ्यांना नकोय आम्ही दानवे यांनाच त्यांची पदवी देणार आहोत उद्यापासून दानवेंना साला दानवे असं संबोधलं जाणार. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी  दानवेंवर हल्लाबोल  चढवला.

 

शेतकऱ्यांचा अपमान केल्याच्या निषेर्धात उद्यापासून संपूर्ण राज्यभर त्याच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन  केलं जाणार आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केलेली नसताना, कर्ज माफ़ी केली नसताना अश्या प्रकारचे वक्तव्य केले जातात. दानवेंच वक्तव्य दनावापेक्षा भयंकर आहे. भाजपाने त्यांच्या वक्तव्याचं उत्तर द्यावे. असे चव्हाण यांनी  म्हटलं आहे.

COMMENTS