“देशात आरएसएस सोडून सगळेच असुरक्षित” !

“देशात आरएसएस सोडून सगळेच असुरक्षित” !

औरंगाबाद – देशात केवळ मुस्लिमच नाही तर दलित, अल्पसंख्याक आणि सर्व समाजचं असुरक्षित असल्याची टीका काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.  केवळ आरएसएसची मंडळी या देशात सुरक्षीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सरकारच्या विरोधात बोलण्याची सोय राहिली नाही. कुणी काही सरकारच्या विरोधात बोललं की ईडी, सीबीआय त्याच्या अंगावर सोडले जातात. अशी नव्या प्रकारची लोकशाही भाजप देशात रुजवू पाहतोय असा आरोही आझाद यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन अभावी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिमुकल्यांचा जीव गेला. त्याला हॉस्पिटल प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार आहे. योगींच्या स्वतःच्या जिल्ह्यात लहान मुलं सुरक्षित नसतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही आझाद यांनी केली.

COMMENTS