धुळ्यात माजी महिला सरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

धुळ्यात माजी महिला सरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

धुळे – जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ही घटना काल (दि.29) दुपारी घडली.  

मालतीबाई निकुंभे यांना ताप असल्यामुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शेतातून फेरफटका मारून आल्यानंतर त्याना अचानक ताप वाढल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्या शरीरात 106 डिग्रीपर्यंत ताप होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

COMMENTS