भाजपच्या पाच मंत्र्याना डच्चू मिळण्याची शक्यता !

भाजपच्या पाच मंत्र्याना डच्चू मिळण्याची शक्यता !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळात येत्या 15 दिवसांत फेरबदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेह-यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ज्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे त्यामध्ये मुंबईतील विद्या ठाकूर, पालघरमधील आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, जालन्यातील पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राजकुमार बडोले आणि अंमरीष राजे अत्राम यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली त्यामध्ये खांतेपालटावर चर्चा झाली. नव्या चेह-यांचा समावेश करताना विभागीय समतोल राखला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मंत्रिमंडळाचा फेरबदल होत असल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येही फेरबल होतो का ते पहावं लागेल.

COMMENTS