भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, सीमेवरील पाकच्या बंकर्सवर हल्ला

भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, सीमेवरील पाकच्या बंकर्सवर हल्ला

वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताची छेड काढणा-या पाकिस्तानला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय लष्कराने सीमेवर असलेल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्दवस्त केल्या आहेत. त्यावर सात क्षेपणास्त्र टाकली आहेत. या कारवाईचा एक व्हिडिओही भारतीय लष्कराकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानची बंकर्स पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचं दिसत आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्ताने दोन भारतीय जवानाचीं हत्या केली होती. तसंच हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाची विटंबणाही केली होती. त्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला होता. त्यानुसार आजची कारवाई केली आहे.

COMMENTS