मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका, आत्महत्या करण्यापूर्वी शेतक-याने लिहिली चिठ्ठी

मुख्यमंत्री आल्याशिवाय मला जाळू नका, आत्महत्या करण्यापूर्वी शेतक-याने लिहिली चिठ्ठी

सोलापूर –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गावात येईपर्यंत माझ्या मृतदेहाला अग्नी देऊ नका अशी चिठ्ठी लिहून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वीट गावातील शेतकरी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केलीय. 45 वर्ष वय असलेल्या जाधव यांनी बुधवारी रात्री 8 च्या सुमारास आत्महत्या केलीय. धनाजी जाधव यांना अडीच एकर कोरडवाहू जमीन असून त्यांच्यावर स्टेट बँक,,सोसायटीच लाखो रुपये कर्ज आहे. घरातील थोरला व्यक्ती असल्याने सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. आई,वडील, लहान भाऊ, पत्नी, आणि 2 मुले अस त्यांचं कुटुंब आहे. मात्र शेतीतील सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी मित्रांच्या नावे चिठ्ठी लिहिली असून त्यात मुख्यमंत्री आल्याशिवाय आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे कर्ज  माफ झाल्याशिवाय मला जाळू नका,अशी विनंती केली आहे.  कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना वीटमध्ये धनाजी चंद्रकांत जाधव यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

COMMENTS