मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी मेळाव्यात पैसे वाटून गर्दी, राष्ट्रवादीचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी मेळाव्यात पैसे वाटून गर्दी, राष्ट्रवादीचा आरोप

इस्लामपूर येथील झालेल्या भाजपाच्या शेतकरी मेळावासाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, भाजपने पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर कटप्पा म्हणून टीका करणारे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच खरे कट्टप्पा आहेत, त्यांनी तर खासदार राजू शेट्टींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तर पैसे वाटून लोकं गोळा करण्याची संस्कृती राष्ट्रवादीचीच आहे,  असा पलटवार भाजपाने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, भाजपाचा शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील आणि खासदार राजू शेट्टीच्या वर टीका करण्यात आली.

राजकीय वातावरण तापवणाऱ्या या सभेसाठी पैसे वाटून गर्दी गोळा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मेळाव्यासाठी आलेल्या लोकांना मेळावा संपल्यावर याद्या मध्ये नोंद करून पैसे वाटप केल्याचं चित्रण कॅमेऱ्यात चित्रित झालं आहे. भाजपने पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर कटप्पा म्हणून टीका करणारे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत हेच खरे कट्टप्पा आहेत, त्यांनी तर खासदार राजू शेट्टींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

 

 

COMMENTS