या ‘तीन’ टोलनाक्यांवर 29 वर्ष टोलवसूली सुरूच राहणार 

या ‘तीन’ टोलनाक्यांवर 29 वर्ष टोलवसूली सुरूच राहणार 

नवीन पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना निधी उभारण्यासाठी राज्य सरकारने तीन टोलनाक्यांवर वसुलीचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील वांद्र -वरळी, सी लिंक, वाशी आणि मुंबई -पुणे एक्सप्रेस वे या टोलनाक्यांचा समावेश आहे. या टोलनाक्यावर पुढील 29 वर्षे टोलवसुली सुरूचा राहणार आहे.

वांद्र – वर्सोवा, सी लिंकच्या कामासाठी, वांद्र- वरळी सी लिंकचा टोल 2068 पर्यंतच खुला राहणार आहे. खाडीवरील पुलाच्या रूंदीकरणासाठी वाशी टोलनाक्यावर 2038 पर्यंत तर लोणावळा – खंडाळा भुयारी मार्गाच्या कामासाठी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोल वसुली 2045 पर्यंत सुरू राहणार आहे. पायाभूत सुविधांसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने एमएसआरडीला अतिरिक्त टोल वसुलीची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत.

 

COMMENTS