लातूर एक्सप्रेस बिदरला नेण्याऐवजी परळीला न्यावी, धनंजय मुंडेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

लातूर एक्सप्रेस बिदरला नेण्याऐवजी परळीला न्यावी, धनंजय मुंडेंची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

दिल्ली – मुंबई – लातूर एक्सप्रेस सध्या बिदरपर्यंत नेली जात असल्यामुळे वाद सुरू आहे. लातूर शहरातील आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी ही गाडी बिदरपर्यंत नेण्याला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही ठिकाणच्या नागरिकांनी कडकडीत बंद पाळून त्याचा विरोधही दर्शवला होता. या वादात आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. लातूर एक्सप्रेस बिदरला नेण्याऐवजी ती परळीला न्यावी अशी मागणी मुंडे यांनी केलीय. आज त्यांनी दिल्ली दिल्लीत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ही मागणी केलीय.

COMMENTS