विधीमंडळावर आता सत्ताधारीच काढणार महामोर्चा !

विधीमंडळावर आता सत्ताधारीच काढणार महामोर्चा !

नाशिक – विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष, विविध संघटना विधानभवनावर मोर्चा काढत असतात. आता मात्र सत्ताधारी पक्षच विधीमंडळावर मोर्चा काढणार आहेत. होय, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं थेट आता विधीमंडळावर सरकारविरोधात महामोर्चा काढण्याचं ठरवलंय.  येत्या पावसाळी अधिवशनात शिवसेना शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी विधानभवनावर मोर्चा काढणार आहे. शिवेसना नेते सुभाष देसाई आणि संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. शिवसेनेच्या वतीनं येत्या 19 तारखेला म्हणजे परवा नाशिकमध्ये कृषी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारविरोधी आणि कर्जमुक्तीसाठीची लढाई अधिक तीव्र करणार असल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं. विशेष म्हणजे शिवसेनेच्या या कृषी अधिवेशनाला सरकारमधील आणखी एक घटक पक्ष आणि भाजपचा मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हेही हजेरी लावणार आहेत.

COMMENTS