शिल्पा शेट्टीला तात्पुरता दिलासा, मात्र अटकेची टांगती तलवार कायम

शिल्पा शेट्टीला तात्पुरता दिलासा, मात्र अटकेची टांगती तलवार कायम

ठाणे –  अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रासह त्यांच्या 3 पार्टनर्सच्या विरोधात 24 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोनगांव पोलीस ठाण्यात 26 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने सिनेजगतासह उद्योग क्षेत्रातही  खळबळ उडाली आहे. पैशांच्या अपहारा प्रकरणी  शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली आदी पाच पार्टनर्सच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या पाचही पार्टनर्सना पोलीस निरीक्षक व्ही.के.देशमुख यांनी नोटीस बजावून पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी फर्मान काढले होते.

मात्र अटक टाळण्यासाठी या सर्वांनी तत्काळ ठाणे जिल्हासत्र न्यायालयात धाव घेवून अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयाला विनंती केली होती. त्यानुसार न्यायाधीश खलिके यांनी 17 मे पर्यंत  पाचही जणांना अटक करू नये असे आदेश दिले. मात्र 17 मेनंतर ठाणे न्यायालयाने जामीन रद्द केल्यास  या सर्वांच्या अटकेवर टांगती तलवार असल्याने शेट्टी दांपत्याची धाकधूक कायम आहे.

सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दांपत्याने बेस्ट डील कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापाऱ्यांना फसवले असून त्यांनी आजपर्य़ंत  सुमारे 18 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

COMMENTS