शिवसेना हा सर्वाधिक गोंधळलेला पक्ष, नबाव मलिक यांची टीका

शिवसेना हा सर्वाधिक गोंधळलेला पक्ष, नबाव मलिक यांची टीका

मुंबई – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सध्याची शिवसेना हा सर्वात गोंधळलेला पक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेची फळे चाखायची आणि त्याच वेळी सरकारवर टीका करायची अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांना यावेळी केली.

राज्यभर काल शिवसेनचे कार्यकर्ते कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले होते त्याचवेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र कार्यक्रमात होते अशीही टीका मलिक यांनी केली. सामना पेपरमधील संजय राऊत यांच्या मोदी पवार भेटीवरील बातमीवर ते बोलत होते. शिवसेना स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीबाबत सामनातून बातम्या पेरल्या जात असल्याची टीकाही मलिक यांनी केली आहे.

पवार मोदी भेटीबाबतचे वृत्त सुप्रीया सुळे यांनीही फेटाळून लावले आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं सांगत भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही असंही मलिक म्हणाले.

COMMENTS