शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ‘सुकाणू समिती’ स्थापन

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ‘सुकाणू समिती’ स्थापन

शेतक-यांचं आंदोलन आज महाराष्ट्र बंदमुळे चांगलंच पेटलं असताना आता या शेतकरी संपाची पुढची दिशा ठरवण्यासाठी एका नव्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यामध्ये शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे.

या समितीच्या सदस्यांमध्ये रघुनाथदादा पाटील, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, अनिल धनवट, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते आहेत. नुकताच या समितीबद्दलची माहीती शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील यांनी दिली.

यावेळी गिरधर पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या संपातून राजकीय पक्षाला वेगळे करण्यात आल्याने आता या संपाला हिंसक वळण न येता अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात येणार. तसेच या समितीत आणखी काही लोकांचा समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुकाणू समितीतील सदस्यांची नावे –
राजू शेट्टी ,अजित नवले, रघुनाथदादा पाटील,  संतोष वाडेकर, संजय पाटील, बच्चू कडू, विजय जवंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नाना नानखिले, डॉ.बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरीधर पाटील, गणेश कदम, करण गायकर हंसराज वडघुले, अनिल धनवट.

 

COMMENTS