शेतकरी नेत्याला व्यापाऱ्यांकडून मारहाण

शेतकरी नेत्याला व्यापाऱ्यांकडून मारहाण

औरंगाबाद – कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच राज्यात संप पुकारला आहे.  या आंदोलनाला राज्यातील अनेक भागात हिंसक वळण लागलं आहे.  यातच औरंगाबाद मधील जाधववाडी मार्केटमध्ये आज शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना व्यापाऱ्यांनी मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार,’जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन करत बाजार बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी सूर्यवंशी यांनी उभ्या असलेल्या एका ट्रकची हवा सोडण्याच्या प्रयत्न केला असता तेथील व्यापाऱ्यांनी मिळून सूर्यवंशीसह काही शेतकऱ्यांना मारहाण केली. यामुळं काहीवेळ या मार्केट मध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

 

COMMENTS