संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून

संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून

सिंदखेड राजा येथून प्रारंभ; शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक अधिक आक्रमक

 

शेतकरी कर्जमाफीबाबत महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शनिवार, 15 एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. राजमाता जिजाऊंचे  जन्मस्थळ सिंदखेड राजा जि. बुलडाणा येथून प्रारंभ होऊन ही यात्रा बुलडाणा, जळगाव,धुळे, नंदुरबार, नाशिक,पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, 18 एप्रिल रोजी शहापूर येथे दुस-या टप्प्याचा समारोप होईल.

 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शेतकरी कामगार पक्ष,समाजवादी पक्ष,रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,  जनता दल (संयुक्त) आदी विरोधी पक्षांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा निघत आहे. भाजप-शिवसेना युती सरकारला शेतकरी आत्महत्या रोखण्यात आलेले अपयश,शेतकरी कर्जमाफीसाठी केली जाणारी दिरंगाई, शेतीमालाचे कोसळलेले भाव, शासकीय खरेदीबाबत सरकारची अनास्था आदी प्रश्नांबाबत निषेध करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

 

या यात्रेमध्ये विरोधी पक्षांचे राज्यातील सर्व प्रमुख नेते व आमदार सहभागी होणार आहेत. यात्रेचा कार्यक्रम सोबत जोडला आहे.

COMMENTS