संपकरी शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यानं संपवली जीवनयात्रा

संपकरी शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यानं संपवली जीवनयात्रा

नाशिक – येवला तालुक्यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी नवनाथ चांगदेव भालेराव (वय-30) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.  काल रात्री (सोमवारी) 11 वाजण्याच्या सुमारास विष पिऊन त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे.

नवनाथ भालेराव यांचा शेतकरी संपातील सक्रिय सहभाग होता. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भालेराव यांचा लासलगांव रोडवरील पिंपरी फाटा येथे झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

भालेराव यांच्यावर पिंपरी सोसायटी व नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे साडेचार लाख रूपये कर्ज होते. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS