सरकारमधून बाहेर पडा, शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी  – रामदास कदम

सरकारमधून बाहेर पडा, शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंकडे मागणी – रामदास कदम

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मातोश्रीवर मंत्री आणि आमदारांची बैठक पार पडली. यावेळी सर्व आमदार, खासदार, नेते, आदित्य ठाकरे ही या बैठकीला उपस्थित होते.

‘आमची विकासकामे होत नाही त्यामुळे सत्तेतून बाहेर पडायला हवं अशी सर्वच आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे.’ असे रामदास कदम म्हणालेत.

‘तेव्हा विभागानुसार उद्धव ठाकरे आमदारांना भेटून यामधुन मार्ग काढतील, चर्चा करतील. त्यावर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेणार आहे. मंत्र्यांनाच अधिकार नाही तर ते कोठुन काम करणार. म्हणूनच या गोष्टी स्पष्ट होणे आवश्यक आहे. मंत्र्यांच्या अंगावर आमदारांना सोडायचे, पक्षामध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम होत असेल तर ते होता कामा नये यांवर चर्चा झाली.’ असे कदम यावेळी म्हणाले. तसेच शिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महागाई विरोधात लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे.

COMMENTS