सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतक-यांचा विचार करत आहे – पांडुरंग फुंडकर

सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतक-यांचा विचार करत आहे – पांडुरंग फुंडकर

बुलडाणा –   सरकारने  दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली.  89 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. मात्र गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून आंदोलनाची भाषा करत आहे, असा गंभीर आरोप कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे.

बुलडाण्यात पांडुरंग फुंडकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मात्र हा दावा चुकीचा असल्याचे म्हणत सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करत सुकाणू समिती आक्रमक झाली आहे. तसेच पुन्हा नव्याने आंदोलन छेडण्याची तयारी अजित नवले, बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे.  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी सुकाणू समितीने केली आहे. त्यासाठी सरकारविरोधात सुकाणू समिती आंदोलन करणार आहे.

 

COMMENTS