त्यावेळी बाळासाहेबांनीच गुंडांचा बंदोबस्त केला –आदित्य ठाकरे

त्यावेळी बाळासाहेबांनीच गुंडांचा बंदोबस्त केला –आदित्य ठाकरे

पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मुंबईतील गुंडांचा बंदोबस्त केला होता असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. १९९० च्या सुमारास एखाद्या व्यक्तीने चार चाकी गाडी घेतली की, त्या व्यक्तीला लगेच धमकी दिली जायची. त्यामुळे अनेक व्यवसायिक आणि सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले होते. परंतु त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सर्व गुंडांचा बंदोबस्त केला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबईतील टोळया संपल्याने मुंबईमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे टाटा, बिर्ला, अंबानींसारखे अनेक उद्योजक मुंबईमध्ये व्यवसाय करीत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी तरुणांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही कोणतेही काम आवडीने करा. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS