अहमदनगर – ‘या’ उमेदवारांचे अवैध अर्ज औरंगाबाद खंडपीठाने ठरवले वैध !

अहमदनगर – ‘या’ उमेदवारांचे अवैध अर्ज औरंगाबाद खंडपीठाने ठरवले वैध !

अहमदनगर – भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अवैध झालेले उमेदवारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरवले आहेत. वैध भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, प्रदीप परदेशी आणि सुरेश खरपुडे यांचे अर्ज वैध आणि राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे यांचा देखील अर्ज औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरवला आहे.  तर शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जासंबंधी सुनावणी सुरू आहे.

दरम्यान सुवेंद्र गाधी यांनी प्रभाग क्रमांक 11मधून अर्ज दाखल केला होता, तर त्यांच्या पत्नी दीप्ती गांधी यांनी प्रभाग 12मधून अर्ज दाखल केला होता. दोघांच्या अर्जावर गिरिश जाधव व संभाजी कदम यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले होते. यानंतर आज सुवेंद्र गांधी, दीप्ती गांधी, प्रदीप परदेशी आणि सुरेश खरपुडे यांचे अर्ज आणि राष्ट्रवादीचे योगेश चिपाडे यांचा देखील अर्ज औरंगाबाद खंडपीठाने वैध ठरवला आहे.

 

COMMENTS