अजित पवारांची ताकद असती तर.. – चंद्रकांत पाटील

अजित पवारांची ताकद असती तर.. – चंद्रकांत पाटील

नाशिक -‘अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं’, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण केला आहे. सरकार भक्कम असल्याचा विश्वास शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते व्यक्त करत आहेत. त्यात निवडणुकीवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना माघारी फिरण्यासाठी अजित पवार यांनी साद घातल्याने व भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचे विधान केल्याने चंद्रकांत पाटील यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं’, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना डिवचलं. भाजपमधील काही आमदार नाराज असल्याच्या दाव्याचा त्यांनी समाचार घेतला. तुमचं आघाडी सरकार चांगलं चाललंय तर मग आमच्या आमदारांना तुम्ही आकर्षिक कशाला करताय?, असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीत लवकरच महाभरती होणार या जयंत पाटील यांच्या विधानाची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली. तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असा टोला पाटील यांनी लगावला.

COMMENTS