‘हे’ सरकार सत्तेवर आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रावर सर्वात जास्त अन्याय – अजित पवार

‘हे’ सरकार सत्तेवर आल्यापासून पश्चिम महाराष्ट्रावर सर्वात जास्त अन्याय – अजित पवार

सांगली – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेवर निवडून आल्याचा सर्वात जास्त फटका पश्चिम महाराष्ट्राला बसला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी पुराव्यासह सिद्ध करू शकतो असंही ते म्हणाले आहेत. तसेच भाजप सरकारच्या काळात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता फसवणीस म्हटले जाते. गिरीश बापट, बावनकुळे, हे सगळे शहरी माणसं यांना काय कळतंय, आम्ही लोक ग्रामीण भागातील आहोत. असंही अजित पवार यांनी हल्लाबोल यात्रेत म्हटलं आहे.

दरम्यान देशामध्ये जनतेला कृषीमंत्री कोण आहे, हे माहीत नाही. कृषीमंत्री कधी फिरत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. तसेच सरकारमध्ये खमक्या पणाने काम करावे लागते. आम्ही कसे निर्णय घेत होतो, भाजप यांच्यात तसा निर्णय घेणारा खमक्या नेताच कोणी नसल्याचं अजितदादांनी म्हटलं आहे. तसेच आम्हाला कामधंदा नाही म्हणून हल्लाबोल करत नाहीत. आमचे जळतंय, या सरकारचे काम पाहून हे लोक काहीच करत नाहीत. स्मृती इराणी यांनी फेक न्यूज दिली की अधिस्वीकृती रद्द करण्याचं पत्रक यांनी काढले होते. चौथा स्तंभ पत्रकाराचा ही उध्वस्त करण्याचे काम हे लोक करत असल्याचंही अजितदादांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS