कोणत्याही मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला की, समिती नेमणे ही सरकारची ठरलेली खेळी – अजित पवार

कोणत्याही मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाला की, समिती नेमणे ही सरकारची ठरलेली खेळी – अजित पवार

मुंबई – शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी नेमलेली मंत्री समिती ही एक सरकारची चाल असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. कुठलाही मुद्दा गळ्यापर्यंत आला की सरकार समिती नमते, अभ्यास करणार म्हणते. 3.5 वर्षे झाली आता अभ्यास काय करताय असा सवाल अजित पवार यांनी सरकारला केला आहे.

दरम्यान मोर्चामधील मुद्दे काही नवीन नाहीत जुनेच आहेत. मोर्चा निघाला तेव्हापासून 6 दिवस सरकार झोपले होते का असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.तसेच मोर्चाला प्रतीसाद मोठा असल्याचे लक्षात येताच काल रात्री खडबडून हे जागे झाले असून त्यानंतर लगेच मंत्र्यांची  समिती नेमण्यात आली आहे. इतके दिवस झोपा काढल्या का? अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली आहे.

COMMENTS