मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- अजित पवार

औरंगाबाद – औरंगाबादसह मराठवाड्यातील काही शहरात परिस्थिती गंभीर असून पीकं वाया गेली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची अडचण याठिकाणी भासत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मराठवाड्यात बैठक घ्यावी आणि दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीने आज औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मराठवाड्यात यावर्षी अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

COMMENTS