राष्ट्रवादीच्या स्थापना दिनानिमित्त अजित पवारांचं कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन !

राष्ट्रवादीच्या स्थापना दिनानिमित्त अजित पवारांचं कार्यकर्त्यांना ‘हे’ आवाहन !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
आज 10 जून 1999 ला शरद पवारांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. स्थापना दिवसाच्या शुभेच्छा. नरेंद्र मोदींची लाट देशात होती. मोदींचं सरकार बहुमतानं आलं. मात्र, निवडणूका येतात-जातात, कार्यकर्त्यांनी आता जोमानं कामाला लागावं असं आवाहन अजित वार यांनी केलं आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर लक्ष केंद्रीत करायचंय. समविचारी पक्षांना सोबत घ्यायचं. समविचारी लोकांचं सरकार आणण्याचे सगळे प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या सत्ताधा-यांमध्ये येणा-या निवडणूकीनंतर मुख्यमंत्री कोण अशा चर्चा सुरु आहेत. त्यांना चर्चा करु द्या. आम्हाला वाटतं मुख्यमंत्री आघाडीचाच झाला पाहिजे. पाऊस सुरु झालाय, वातावरण बदलतंय. दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. बेरोजगारी वाढतेय. सत्ताधा-यांना ठोस भूमिका घेता आली नाही. सध्या सत्ताधारी फक्त निवडणूकीतच गुंतले आहेत. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. उन्हाळ्यातले परदेश दौरे करुन झालेत आता पावसाळा सुरु होतोय आणि आता दुष्काळ दौरे करतायेत.शिवसेना अजूनही आपण सत्तेत आहोत की विरोधात आहेत याबाब संभ्रमात आहे. उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. कोण उपमुख्यमंत्री होईल हे महाराष्ट्रही पाहिल आणि आम्हीही पाहुच. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आयोध्या वारीवरुनही अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. विकासाचा मुद्दा राहिला नाही त्यामुळे धार्मिक, भावनिक मुद्दा उभा करुन जनाधार आपल्या बाजुनं करायचा प्रयत्न करायचा हे प्रकार सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS