अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार ? – अजित पवार

अयोध्येला जाऊन काय दिवे लावणार ? – अजित पवार

सातारा – साताऱ्यातील कोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली आहे .शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचा भाषणातील अयोध्याच्या मुद्यावर बोलताना फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांसमोर जाता येत नसल्याने हे अयोध्येला निघाले आहेत तेथे जाऊन काय दिवे लावणार आहे अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

युती सरकारचे मंत्री बावचळून गेले आहेत यांनी घरपोच दारू द्यायचा निर्णय घेतला आहे यांचा बापाने घरपोच दारू दिली होती का अशी  टीका  करत राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेत पोरी काय यांचा बापाचा आहेत का? त्या मुलींना आपले मत आहे की नाही असा प्रश्न देखील विचारला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  सभेत अजित पवार यांनी युती शासनावर टीका केली आहे. यावेळी बोलताना आ. शशिकांत शिंदे हे  हिरो असल्याचे आणि त्यांना चित्रपटात हिरो म्हणून आणि आम्हाला वृद्ध व्यक्ती म्हणून घेतील अशी  मिश्किल कोपरखळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून मारली आहे.

COMMENTS