‘या’ मुद्यावरुन शिवसेना-भाजपची युती होईल, अजित पवारांनी केला दावा !

‘या’ मुद्यावरुन शिवसेना-भाजपची युती होईल, अजित पवारांनी केला दावा !

जळगाव – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले तर त्यांना फटका बसू शकतो त्यामुळे  शेवटच्या क्षणी राम मंदिरसारख्या मुद्द्यावर आमचं एक मत झालं, असं म्हणून युती करतील, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट आता ओसरली असून जनतेच्या मनात आता सरकारबाबत नाराजी असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा आघाडीचा निर्णय झाला आहे. 48 पैकी 44 जागांवर दोन्ही पक्षांचं एक मत झालं असून उर्वरीत चार जागांचा निर्णय चर्चेअंती सोडवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांसह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा विचार सुरु असल्यांही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS