शिवसेनेच्या वाघाची शेळी, शेळीचा ससा आणि आता कासव झाला, अजित पवारांचा हल्लाबोल !

शिवसेनेच्या वाघाची शेळी, शेळीचा ससा आणि आता कासव झाला, अजित पवारांचा हल्लाबोल !

नांदेड – शिवसेनेच्या वाघाची शेळी, शेळीचा ससा, आणि आता कासव झाली असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच शेपुट घातलेल्या कुत्र्यासारखी शिवसेनेची अवस्था भाजपनं केली असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान ते नांदेडमध्ये बोलत होते.

यावेळी बोलत असताना त्यांनी राज्यसरकारवरही जोरदार टीका केली आहे. शासनाचे धोरण चुकीचे असून अन्न पिकवणाऱ्याला योग्य दर मिळाला पाहिजे पण सरकार यात काहीच करीत नसल्याचं पवार म्हणाले आहेत. तसेच आम्ही संघर्ष यात्रेच्या माध्यमातून कर्जमाफी मागीतली म्हणून सरकारनं कर्जमाफी दिली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही विधिमंडळात बोंडअळीचा प्रश्न मांडला, विधीमंडळ चालू न देण्याचा निर्वाणीचा इशारा त्यावेळी दिल्यामुळे सरकारनं बोंड अळीबाबत शेतक-यांना मदत जाहीर केली असल्याचंही अजित पवार यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS