अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राष्ट्रसूर्याचा अस्त – अजित पवार

अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने राष्ट्रसूर्याचा अस्त – अजित पवार

मुंबई – माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 93 व्यावर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी देशभरात वा-यासारखी पसरली असून राजकीय अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी देखील अटल बिहारी वाजेपेयी यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनामुळे एका राष्ट्रसूर्याचा अस्त झाला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS