प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ?, अजित पवारांची जोरदार टीका!

प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ?, अजित पवारांची जोरदार टीका!

रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा आज खेड येथे पार पडली. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. निवडणुका आल्या की त्यांना प्रभू रामचंद्र आठवतात. प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला ? आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का ?, असा सवाल अजित पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. आज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का? जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावूक करायचे हाच उद्योग सुरु असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान शहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का? नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवाल त्यांनी विचारला आहे.  निवडणुका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलीस शुटिंग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का? कोणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात असल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.­

COMMENTS