सुप्रियाताईंनी आणलेली टोपी अजितदादांनी घातलीच नाही,  ओवाळणीनंतर त्यांच्या लक्षात आलं !

सुप्रियाताईंनी आणलेली टोपी अजितदादांनी घातलीच नाही, ओवाळणीनंतर त्यांच्या लक्षात आलं !

बारामती – रक्षाबंधन सण देशभरात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रक्षाबंधन सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा केला. दरवर्षीप्रमाणे सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना राखी बांधली. यावेळी कोरोनाची परिस्थितीत असल्यामुळे अजितदादा हातातील ग्लोजसह घरी दाखल झाले होते.
सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ शेअर करून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्या दिल्या आहेत.

दरम्यान अजितदादांना राखी बांधताना एक किस्सा घडला. सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण ओवळणं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, टोपी घालायची राहूनच गेली. त्यामुळे ‘अरेच्या टोपी इथंच राहिली’ म्हणून अजितदादांना हसू आवरले नाही. यावेळी समोरच शरद पवार सुद्धा बसलेले होते. हा प्रकार पाहून त्यांनाही हसू उमटले. सुप्रियाताई देखील हसत होत्या. त्यानंतर राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

COMMENTS