विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता, ना नीती – अमित शाह

विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता, ना नीती – अमित शाह

पुणे – विरोधकांच्या आघाडीकडे ना नेता आहे, ना नीती आहे अशी जोरदार टीका भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. देशात मजबूत सरकार केवळ मोदीच देऊ शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकायच्या असतील तर, त्यासाठी बारामती जिंकावीच लागेल, तेथे विजयी मिळाल्यानंतरच ४५ जागा होतील असंही अमित शाह यांनी पुण्याती कार्यक्रमता म्हटलं आहे.

दरम्यान आयोध्येत त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर होणार असून त्यासाठी भाजप कटीबध्द असल्याचंही शाह यांनी म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिसा जिंकणारच आहोत. भाजपला रोखण्यासाठी ममता दीदी आटापिटा करीत आहेत. पण आता ममता दिदींची सुटका नसल्याचंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. देशाचा गौरव आणि विकास करेल तेच देशाचे सक्षम नेतृत्व करेल, हे मोदींनी दाखवून दिले आहे. तसेच महाराष्ट्राला खाली आणण्याचे काम काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाने केले असल्याची टीकाही यावेळी शाह यांनी केली आहे.

COMMENTS