सांगलीत भाजपा नव्हे जे जे पी (जयंत जनता पार्टी) , होम पिचवर काँग्रेसकडून हल्लाबोल !

सांगलीत भाजपा नव्हे जे जे पी (जयंत जनता पार्टी) , होम पिचवर काँग्रेसकडून हल्लाबोल !

सांगली – भारतीय जनता पार्टी नव्हे ही तर भारत जलाव पार्टी आहे, आणि राज्यातील सरकार हे फडनविस सरकार नाही तर, फसणविस सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात अशोक चव्हाण बोलत होते. या मेळाव्यात काँग्रेसच्या दोन्ही माजी मुख्यमंत्र्याकडून’ नरेंद्र आणि देवेंद्र’ यांना टार्गेट करण्यात आले. तर सांगली जिल्ह्यात भाजपा नव्हे जे जे पी (जयंत जनता पार्टी) आहे. आणि भाजपा ही राष्ट्रवादीची बी टीम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे.

तसेच लाज नाही शरम नाही, फक्त खोट बोलत बसायचं हे भाजपा सरकार करतय, मात्र काँग्रेसने कधी खोटं बोलून राज्य केले नाही, अस वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केलं. तर मोदी हे हुकूमशहा नेते आहेत, ते कोणाला पण विश्वासात घेत नाहीत, त्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळेच देशाला धोका निर्माण झाला आहे, अशी टीका, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तर सांगली जिल्ह्यात भाजपा नव्हे जे जे पी (जयंत जनता पार्टी) आहे. आणि भाजपा ही राष्ट्रवादीची बी टीम आहे. त्यातच जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, त्यामुळे जरा जपून आघाडीचा निर्णय करावा, असा खोचक टोला, काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी लगावला आहे.

 

COMMENTS