रावसाहेब दानवेंनी आता फक्त जालना जिल्हा सांभाळावा, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल !

रावसाहेब दानवेंनी आता फक्त जालना जिल्हा सांभाळावा, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल !

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.रावसाहेब दानवे यांना अर्थकारण कळत नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती कशापद्धतीने आकारल्या जातात त्याची जाणीव त्यांना माहिती नाही. त्यामुळे मला वाटतं आता रावसाहेब दानवे यांनी फक्त त्यांचा जालना जिल्हा सांभाळावा, त्या ठिकाणी काय होते ते बघा आता अशी जोरदार टीका चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान रावसाहेब दानवेना दररोज नवीन जावईशोध कसे सुचता हे काही कळत नाही, त्यांना राफेल आहे की रायफेल ते कळाले नसेल अजून, राफेल ह्या विषयावर दानवे यांनी बोलू नये रावसाहेब दानवे यांच्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. दानवे यांचे मानसिक संतुलन कदाचित बिघडले असावे असे मला वाटतंय, अभ्यास नकरता काहीही उटसुट वक्तव्य करतायत, अशी बेताल वक्तव्य दानवे यांना शोभत नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS