उस्मानाबादमधील काँग्रेसने विश्वासघात केला, राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांचा थेट आरोप !

उस्मानाबादमधील काँग्रेसने विश्वासघात केला, राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार अशोक जगदाळे यांचा थेट आरोप !

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी विश्वासघात केल्यामुळेच आपला पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते जास्त असूनही जगदाळे यांचा पराभव झाला. लातूर आणि बीडमधील दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चांगले काम केले. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी गद्दारी केली असा आरोप जगदाळे यांनी केला आहे.

जगदाळे यांचा निशाणा प्रामुख्याने काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यावर असल्याची चर्चा आहे. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते जगदाळे यांच्या आरोपाला कसे उत्तर देतात ते पहावं लागेल. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाला हा वाद त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS