अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या 10 मोठ्या घोषणा!

अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या 10 मोठ्या घोषणा!

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकय्रांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत हे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असून सिंचन प्रकल्पाची जी कामे राहिली आहेत, ती आधी पूर्ण केली जातील असंही उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या या 10 मोठ्या घोषणा

1) महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख
रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार.

2) गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी योजना सुरु होणार.

3) पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.

4) समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार.

5) समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार.

6) यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार

7) कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु.

8) सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही.

9) आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद.

10) मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही.

COMMENTS