जयदेव ठाकरेंचा ‘तो’ बंगला कोणामुळे वाचला ?, उद्धव ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांचा प्रतीसवाल !

जयदेव ठाकरेंचा ‘तो’ बंगला कोणामुळे वाचला ?, उद्धव ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांचा प्रतीसवाल !

मुंबई – बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी तुमची आपुलकी कुठे गेली होती असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना केला होता. त्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं असून जयदेव ठाकरेंचा येऊरमधील बंगला कोणामुळे वाचला असा प्रतीसवाल आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच काही गोष्टी मनाच्या कप्प्यामध्ये ठेवायला हव्यात, त्यांना वाचा फोडावं असं काही नाही, असंही आव्हाड यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे म्हणाले आहेत तेच खरं असून आतापर्यंतचं जे राजकीय कल्चर होतं ते उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संपुष्टात येत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. काल घेण्यात आलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीत पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची स्तुती केली होती. परंतु हे केवळ राजकारण असून 2000 मध्ये बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी तुमची आपुलकी कुठे गेली होती असा सवाल उद्धव यांनी पवारांना केला होता. त्यानंतर आव्हाडांनी त्यांचा सवाला प्रतीसवाल करत काही गोष्टी मनाच्या कप्प्यात ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

 

 

 

COMMENTS